संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. याच मालिकेतील आणखी एका ताज्या घटनेत, शनिवारी (१ नोव्हेंबर) हिवरगाव पावसा येथे एका ३० वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला असून, ती महिला गंभीर जखमी झाली आहे.
अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव असून ही घटना हिवरगाव पावसा शिवारात घडली. महिला आपल्या शेतातून घरी परतत असताना बिबट्याने दबा धरून तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत, यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. महिलेने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरड्यानंतर परिसरातील नागरिक तात्काळ धावून आले, यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.
या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिकांनी वारंवार बिबट्याच्या दर्शनाची तक्रार करूनही वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, तसेच जखमी महिलेला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच एकविरा फाउंडेशनच्या जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जखमी महिलेची भेट घेत तिला धीर दिला. तसेच नरभक्षक बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी त्यांनी वनविभागाकडे केली.
तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला गंभीर; संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसात भीषण दहशत!
तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.



संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. याच मालिकेतील आणखी एका ताज्या घटनेत, शनिवारी (१ नोव्हेंबर) हिवरगाव पावसा येथे एका ३० वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला असून, ती महिला गंभीर जखमी झाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.
तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.