संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे एक मोठी वीज दुर्घटना टळली असून, टेम्पोमधील चौघेही जण बालंबाल बचावले आहेत.
सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक MH 41 AV 6183) कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर, उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.
अपघात झाला त्या ठिकाणी महावितरणचा मोठा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आहे. नियंत्रण सुटलेला टेम्पो या ट्रान्सफॉर्मरला अगदी घासून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. जर टेम्पोची धडक थेट ट्रान्सफॉर्मरला बसली असती, तर परिसरात वीज प्रवाह उतरून भीषण जीवितहानी झाली असती. मात्र, ट्रान्सफॉर्मर वाचल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला.
या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानू बाळाजी जाधव यांच्या घराच्या कोपऱ्याला धडकला, ज्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. त्यानंतर टेम्पो थेट दगडी बांधकाम असलेल्या विहिरीत जाऊन अडकला. विहिरीचे दगडी बांधकाम कोसळल्याने विहिरीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, टेम्पोमधील चालक आणि इतर तीन प्रवासी अशा एकूण चारही जणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
हा अपघात पहाटे ३ वाजता होऊनही चालक किंवा मालकाने याची माहिती पोलिसांना तत्काळ दिली नाही. सकाळी जेव्हा स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला, तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. माहिती देण्यास उशीर झाल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. शनिवारी सायंकाळपर्यंत हा टेम्पो विहिरीतच अडकलेल्या अवस्थेत होता.
या घटनेमुळे जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर सुरक्षिततेचे उपाय योजनावेत आणि संबंधित वळणांवर सूचना फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! खताचा टेम्पो विहिरीत कोसळला; ४ जण सुखरूप
या घटनेमुळे जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर सुरक्षिततेचे उपाय योजनावेत आणि संबंधित वळणांवर सूचना फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



संगमनेर, प्रतिनिधी –
या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानू बाळाजी जाधव यांच्या घराच्या कोपऱ्याला धडकला, ज्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. त्यानंतर टेम्पो थेट दगडी बांधकाम असलेल्या विहिरीत जाऊन अडकला. विहिरीचे दगडी बांधकाम कोसळल्याने विहिरीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, टेम्पोमधील चालक आणि इतर तीन प्रवासी अशा एकूण चारही जणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

