Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
महाराष्ट्र संवाद विशेष

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा वर्षभरात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने 'चाइल्ड हेल्पलाईन १०९८' किंवा 'पोलीस हेल्पलाईन ११२' या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी,
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

 

 

महाराष्ट्र संवाद न्यूज, अहिल्यानगर: 

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयोमर्यादेचे उल्लंघन करून विवाह लावून दिल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुला-मुलीचे पालकच नव्हे, तर लग्नाचे आयोजक, नातेवाईक आणि या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यासाठी दंडासह कारावासाची देखील तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मोहिमेसाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्यांना अंगणवाडी सेविका साहाय्यक म्हणून मदत करतील. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अधिकारी स्थानिक पातळीवर होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतील.

विशेषतः मंगल कार्यालये, मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारे यांसारख्या प्रार्थनास्थळांच्या प्रमुखांना प्रशासनाने आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही बालविवाहास सहकार्य करू नये. तसेच बँडपथके, डीजे चालक, केटरर्स, फोटोग्राफर आणि विवाह विधी करणाऱ्या धर्मगुरूंनी वयाची खात्री केल्याशिवाय सेवा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नमूद केले आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा वर्षभरात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने ‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ किंवा ‘पोलीस हेल्पलाईन ११२’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या
१८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण थांबते आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. समाज म्हणून आपण सर्वांनी मिळून संगमनेर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
— जयश्री जाधव (संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग)

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 385
जयश्री जाधव पंकज आशिया बालविवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.