संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान
या भीषण आगीत कंटेनरमधील तब्बल सहा चारचाकी गाड्या जळाल्याने लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे

कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली.

या भीषण आगीत कंटेनरमधील तब्बल सहा चारचाकी गाड्या जळाल्याने लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत. सध्या सुरू असलेल्या वाढत्या उष्णतेमुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.