वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सुरू केलेले हे अभियान तालुक्यात एक व्रत म्हणून चालवले जात आहे. - डॉ. सुधीर तांबे



जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या कार्यक्रमाला दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले, दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, समन्वयक दशरथ वर्पे यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी श्रीमती हिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दंडकारण्य अभियानाचा आढावा घेताना सांगितले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सुरू केलेले हे अभियान तालुक्यात एक व्रत म्हणून चालवले जात आहे. यामुळे तालुक्यात मोठी हिरवाई निर्माण झाली. उन्हाळ्यातील पाणीटंचाई व विविध अडचणींवर मात करत कार्यकर्त्यांनी झाडे जगवली आहेत. आगामी काळात अधिक सतर्कतेने हे काम गावोगावी पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.