NEET नंतर महाराष्ट्रात TET पेपरफुटीचा धक्का; परीक्षा रद्द झाल्याने ४ लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला, आमदार सत्यजीत तांबे संताप व्यक्त करताना म्हणाले…
या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर जग AI आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले असताना, आपण अजूनही एक परीक्षा सुरक्षितपणे घेऊ शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे तांबे यांनी नमूद केले. या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी भ्रष्टाचार असून, व्यवस्था पारदर्शक झाल्यास काहींचे हितसंबंध धोक्यात येतील म्हणूनच ही व्यवस्था सुधारू दिली जात नसल्याचा ठाम आरोप त्यांनी केला.


