नाशिक-पुणे रेल्वे रद्द झाल्याने जनतेत संताप; घारगावच्या बैठकीत राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलनाचा निर्धार!
दरम्यान, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली
संगमनेर:
📌 रेल्वेमंत्र्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याने या मार्गात बदल करण्यात आला आहे. यासाठी लवकरच दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली जाईल आणि त्यांच्यासमोर आक्रमक भूमिका मांडली जाईल. नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा सुवर्णमध्य साधण्यासाठी आमचा पाठपुरावा अखंड सुरू राहील.


