संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिका तैनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि दिंडीचे माधव महाराज राठी उपस्थित होते.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या स्वागताच्या परंपरेचा गौरव करत चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली. वारीत कधीही भेदभाव नसतो या वारीतून समतेचा संदेश दिला जातो असे सांगितले. तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असल्याचे सांगत मागीलवर्षी संगमनेरमधील १ हजार युवकांनी यात सहभाग घेतल्याची आठवण करून दिली.




