Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

मागील अध्यक्षांची निवड ३० जून २०२५ रोजी झाली असून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नसताना बेकायदेशीरपणे ही पुनर्रचना का उरकण्यात आली? असाही मुख्य प्रश्न या निवेदनातून समोर आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करताना गंभीर गैरप्रकार आणि मनमानी कारभार झाल्याचा आरोप करत ही निवड प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी त्रस्त नागरिकांनी संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदनाद्वारे तक्रार सादर केली असून, संबंधित प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे आणि शासन निर्णयाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
तक्रारीनुसार, शुक्रवारी (४ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात इतर महत्त्वाच्या विषयपत्रिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड एकाधिकारशाही पद्धतीने उरकण्यात आली. पालकांना नियमानुसार किमान पाच ते सात दिवस आधी अजेंडा न देता केवळ आदल्या दिवशी संध्याकाळी घाईघाईने निमंत्रण का देण्यात आले? असा प्राथमिक प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच बैठकीसाठी आवश्यक गणपूर्ती (कोरम) पूर्ण नसताना आणि ज्या ग्रामस्थांचे पाल्या या शाळेत शिकतच नाहीत, अशा व्यक्तींना बैठकीत बसवून निर्णय कसे घेण्यात आले? यावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
याशिवाय, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सहकारी शिक्षकांना विश्वासात न घेता अपमानास्पद वागणूक का दिली गेली? असा सवाल विचारण्यात आला आहे. शाळेच्या पवित्र वातावरणात राजकीय हस्तक्षेप करून पालकांवर दबाव का आणला गेला आणि आदल्या दिवशीच निश्चित केलेल्या संभाव्य सदस्यांची नावे बालहट्टाने कशी लादली गेली? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मेळाव्याचे विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग करून उपस्थितांमध्ये दहशतीचे वातावरण का निर्माण केले गेले? नियमानुसार शिक्षणतज्ज्ञांची निवड का टाळली गेली? शासन निर्णयाची दिशाभूल करणारी माहिती देऊन पालकांमध्ये भ्रम का पसरवला गेला? आणि जातीनिहाय योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व न देता स्वतःच्या मर्जीतील नावेच का घेतली गेली? अशा अनेक गंभीर प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी तक्रारीद्वारे केली आहे.
मागील अध्यक्षांची निवड ३० जून २०२५ रोजी झाली असून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नसताना बेकायदेशीरपणे ही पुनर्रचना का उरकण्यात आली? असाही मुख्य प्रश्न या निवेदनातून समोर आला आहे. यापूर्वीही संबंधित कारभाराबाबत अनेक तक्रारी आलेल्या असल्याने, राजकीय प्रभावाखाली झालेली ही सर्व निवड प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी आणि पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने नव्याने पुनर्रचना प्रक्रिया पार पाडावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 122
पुनर्रचना मागणी शाळा व्यवस्थापन समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.