Annant Ppangarkar
गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा
एसटी ही ग्रामीण भागाचा पाठीचा कणा आहे. प्रवाशांना त्यांचा हक्काचा प्रवास मिळत नसेल, तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकतील, असा कडक इशारा अमोल शेलकर यांनी दिला आहे.






