महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चिन्हावरुन ठाकरे गटावर निशाणा साधत ‘आपल्याला काय घरांना आग लावायची नाही’ असा उपरोधीक टोला ठाकरेंना लगावला आहे.
सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.
ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नांव दिले आहे. तर धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर नव्याने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले. तर शिंदे गटाने दिलेले नांवाचे तीनही पर्याय फेटाळून लावत त्यांना नव्याने पर्याय देण्यास सांगण्यात आले होते.
ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर भाष्य करत “आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर नवीन पार्टी बनवायची आणि घराघरापर्यत मशाल घेऊन जायची, आपल्याला काय घरांना आग लावायची नाही, सोन्याचा चमचा घेतलेले मुख्यमंत्री असतीलही परंतु स्वत:च्या नांवाने पक्ष काढलाय तर बघू किती पुढे जातात ते ” असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी सत्तार यांनी कृषी विभागासंदर्भात सध्याची सरकारची भूमिका, उपक्रम यावरदेखील भाष्य केले.
आमचे हक्काचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले आहे, आमच्या पक्षाने पहिले निवडलेले चिन्ह रद्द झाले आहे. नवीन चिन्हासाठी पक्षाच्या माध्यमातुन काम केले जात आहे. संध्याकाळपर्यत आयोग आमचे चिन्ह निश्चित करेल. चिन्ह हे महत्वाचे असते. एकनाथ शिंदे साहेब आमचे चिन्ह आहेत. या चिन्हामुळे गोरगरीब, सामान्य त्यांना आपला माणुस म्हणतात.


सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.
ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नांव दिले आहे. तर धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर नव्याने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले. तर शिंदे गटाने दिलेले नांवाचे तीनही पर्याय फेटाळून लावत त्यांना नव्याने पर्याय देण्यास सांगण्यात आले होते.
ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर भाष्य करत “आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर नवीन पार्टी बनवायची आणि घराघरापर्यत मशाल घेऊन जायची, आपल्याला काय घरांना आग लावायची नाही, सोन्याचा चमचा घेतलेले मुख्यमंत्री असतीलही परंतु स्वत:च्या नांवाने पक्ष काढलाय तर बघू किती पुढे जातात ते ” असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी सत्तार यांनी कृषी विभागासंदर्भात सध्याची सरकारची भूमिका, उपक्रम यावरदेखील भाष्य केले.
आमचे हक्काचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले आहे, आमच्या पक्षाने पहिले निवडलेले चिन्ह रद्द झाले आहे. नवीन चिन्हासाठी पक्षाच्या माध्यमातुन काम केले जात आहे. संध्याकाळपर्यत आयोग आमचे चिन्ह निश्चित करेल. चिन्ह हे महत्वाचे असते. एकनाथ शिंदे साहेब आमचे चिन्ह आहेत. या चिन्हामुळे गोरगरीब, सामान्य त्यांना आपला माणुस म्हणतात.