महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोनवर ‘वंदे मातरम’ म्हणावे, वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या पिस्क्रीप्शनवर ‘श्रीहरी’ लिहावे, अशा सरकारच्या फतव्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच मागणी केली आहे.
या मागणी संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार आहेत.
देशात सुख-समृद्धी हवी असेल तर भारतीय रुपयांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे छायाचित्र असायला हवे असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.
बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
केजरीवाल म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत आहे. याचे परिणाम सर्वसामान्यांवर दिसू लागले आहेत. देशातील सामान्यांचे हाल होत असून हा देश समृद्ध व्हावा, नागरिक श्रीमंत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.
यासाठी अनेक पावले उचलावी लागणार आहेत. रुग्णालय निर्मिती, शाळांची निर्मिती, पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. अनेकदा असे होते की, मेहनत करून देखील फळ मिळत नसल्याने यात देवांचे आशीर्वाद देखील आवश्यक असतात.
त्यावेळी त्याचे परिणाम दिसू लागतात. यासाठी केंद्र सरकारने नव्या नोटा छापताना त्यावर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचा फोटो टाकायला हवा. त्यामुळे देशभरात सुख-समृद्धी येईल आणि देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. असा अजब सल्ला दिला असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे.
देशात सुख-समृद्धीसाठी भारतीय रुपयावर गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे छायाचित्र हवे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र

