महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्याच्या गृह विभागाने सोमवारी तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यापैकी 104 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे तर नऊ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत. बदल्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या पोलिस दलात सोमवारी मोठे फेरबदल केले. गृह विभागाने काढलेल्या आदेशामध्ये प्रसाद अक्कानारू, श्रीमती श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रय कांबळे आणि श्रीमती ज्योती क्षीरसागर या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने आज काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
संगमनेरमध्ये यापूर्वी पोलीस उपाधीक्षक म्हणून काम केलेले आणि सध्या नाशिकमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले अजय देवरे यांना लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. तर यापूर्वी श्रीरामपूरमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक असलेले व सध्या नासिक मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक असलेले सुनील कडासने यांची बदली नागपूरला लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय अकोला पोलीस अकॅडमीमध्ये प्राचार्य असलेले अशोक थोरात यांना खामगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अकबर पठाण यांना पुन्हा मुंबईत आणले असून पठाण आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह सात जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा महाविकास आघाडी सरकारने दाखल केला होता. बदल्या झालेले अधिकारी येत्या दोन-चार दिवसात नवीन पदभार हाती घेतील.
राज्य सरकारने बदल्या केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये
इप्पर मंचक ज्ञानोबा, अभिनय देशमुख, अनिल पारसकर, एस. रामकुमार, ए. एच. चावरिया, प्रणय अशोक, अमोघ गावकर, मंजुनाथ सिंगे, राकेशचंद्र कलासागर, प्रियंका नारनवरे, गौरव सिंग, तेजस्वी सातपुते, प्रवीण मुंढे, दीक्षितकुमार गेडाम, मंगेश शिंदे, अजय कुमार बन्सल, मोहित कुमार गर्ग, भाग्यश्री नवटके, संदीप सिंह गिल्ल, मुमक्का सुदर्शन, सुरेश कुमार मेंगडे, राजेश बनसोडे, विश्वास पांढरे, राजेंद्र कुमार दाभाडे, अशोक दुधे, सदानंद वायसे-पाटील, शीला साईल, एस. एस. बुरसे, सुनिता साळुंके-ठाकरे, पुरुषोत्तम कराड, विश्वा पानसरे, वसंत जाधव, स्मार्तना पाटील, प्रशांत मोहिते, धोंडोपंत स्वामी, अमोल तांबे, सुहेल शर्मा, अनुराग जैन, गोरख भामरे, श्रवण दत्त, प्रवीण पाटील, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील-चव्हाण, अविनाश अंबुरे, यशवंत सोळंके, संदीप डोईफोडे, राहुल श्रीरामे, भरत तांगडे, रूपाली खैरमोडे, दीपक देवराज, सुनील लोखंडे, किरण कुमार चव्हाण, प्रशांत खैरे, पंकज डहाणे, राहुल माकणीकर, गीता चव्हाण, संभाजी कदम, शिवराज पाटील, प्रशांत बच्छाव, शशिकांत बोराटे, संदीप पखाले, अमित काळे, दिपाली धाटे, प्रकाश गायकवाड संजयकुमार सुरगौडा-पाटील, मिलिंद मोहिते, तिरुपती काकडे, सुहास बावचे, विजय खरात, योगेश चव्हाण, मारुती जगताप, सागर पाटील, बापू बांगर, गजानन राजमाने, आनंद भोईटे, सचिन पांडकर, यशवंत काळे, राहुल खाडे, खंडेराव धरणे, जयश्री जाधव, दीपक गिऱ्हे, अभिजीत शिवथरे, विजय कबाडे, सुनील लांजेवार, विक्रांत देशमुख, जयश्री देसाई, राजलक्ष्मी शिवणकर, चंद्रकांत खांडवी, एम. एम. मकानदार, धीरज पाटील, निकेश खाटमोडे, अमरसिंग जाधव, अमोल झेंडे, स्वप्ना गोरे, अकबर पठाण, संदीप आटोळे, शर्मिला घार्गे, दिपाली काळे, विजय मगर आणि विवेक पाटील यांचा समावेश आहे.

