महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
वाहतुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेल्या अहमदनगर- मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्गे वळविण्यात येणार आहे.
शनि शिंगणापुर-सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी राहुरीकडे न येता अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जाता येणार आहे.
मनमाड – येवला – शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा, झगडे फाटा (रा.म.मा.क्र.१६० ब)-सिन्नर (रा.म.मा.क्र.१६०)सिन्नर-नांदुर शिंगोटे-संगमनेर आळेफाटा मार्ग वळविण्यात येणार आहे. मनमाड- येवला कडून अहमदनगर-सोलापूर-बीडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापूर-गंगापूर मार्ग -कायगाव- प्रवरासंगम -शेंडी बायपास -विळद घाट – केडगाव बायपास मार्ग वळविण्यात येणार आहे. 
लोणी-बाभळेश्वर-श्रीरामपूरकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर-श्रीरामपूर -टाकळीमान – नेवासा मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गातून ऊस वाहतूक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रक्टर व अन्य वाहने) यांना सूट देण्यात आलेली आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

