महाराष्ट्र संवाद न्यूज
एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी बस तीन चार वाहनांवर आदळल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नासिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे येथील टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आजाराची ही एसटी बस असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने मदत पथके पोहोचले असून मदत कार्य सुरू झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळील शिंदे पळसे टोल नाक्यावर कारचालक अचानक थांबल्यामुळे एसटी बस कारवर जाऊन धडकली. या दोन्ही वाहनांमध्ये दोन-तीन दुचाकी देखील अडकल्या होत्या. अपघातानंतर एसटी बसने लगेचच पेट घेतला.
ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पसरले होते. घटनास्थळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पेटलेली बस विझविली. मात्र ही बस जळून पूर्णता खाक झाली होती.
काही दिवसापूर्वी नाशिकच्या औरंगाबाद नाक्यावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या अपघातात एका ट्रकने खासगी प्रवासी बसला दिलेल्या धडकेनंतर प्रवासी बस पेटली होती. त्यानंतर बस जळून खाक झाली या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला होता. शिंदे पळसे टोल नाक्यावर घडलेल्या अपघातात जखमींपैकी नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा निश्चित आकडा समोर आला नसला तरी प्राथमिक अंदाजानुसार तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
टोल नाक्यावर तातडीने मदत मिळाल्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकले आहेत. प्रशासन आपल्या यंत्रणेसह घटनास्थळी मदत कार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.

