महाराष्ट्र संवाद न्यूज
समाजामध्ये लव जिहादचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असून मराठा समाजातील मुली त्याचे बळी ठरत असल्याने समाजाने यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे.
संगमनेर येथील विश्रामगृह येथे आयोजित नगर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठकीत कोंढरे बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, राहुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, राहता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, अजय हासे, साहेबराव दातखिळे आदी उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले, अखिल भारतीय मराठा महासंघाचा माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून युवकाना कर्ज मिळवून देण्याबरोबर व्यवसायिक मार्गदर्शन केले पाहिजे. सारथीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली अन त्यातून आयएएस., आयपीएस मराठा अधिकारी निर्माण झाले तर समाजासाठी मोठे कार्य होईल. या दोन्ही योजना आरक्षणामुळे होणाऱ्या फायद्यासारखे आहेत.
मराठा समाजाला आता सुधारण्याची गरज असून सध्या पद्धतीने लग्न करावे. मानपानाच्या नादी न लागता मुळाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, आपल्या मुलांची लग्ने ठरवितांना स्थळासंदर्भात पूर्ण खात्री करावी. खरंच तो नोकरीला आहे का? पगार खरा सांगितला आहे का? त्यांनी सांगितलेली स्थावर मालमत्ता त्यांचीच आहे का? या गोष्टी तपासल्या तर नंतर पश्चताप करण्याची वेळ येणार नाही. 
यावेळी राहुरी तालुकाध्यक्षपदी राहुरीचे माजी उप नगराध्यक्ष दिनकर पवार यांची निवड झाल्याबद्दल कोंढरे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

