महाराष्ट्र संवाद न्यूज
उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातामध्ये लष्करातील १६ जवान ठार झाले आहे. तर चार जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने थेट दरीत कोसळला.
भारतीय लष्कराने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, 23 डिसेंबरला उत्तर सिक्कीममधील गेमा येथे एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होता, जे सकाळी चाटणहून थांगूच्या दिशेने निघाले होते.
उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग असून तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे. गेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर लष्कराचे हे वाहन तीव्र उतारावरून घसरले. त्यानंतर अपघात स्थळी तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून चार जखमी जवानांना विमानाने हलवण्यात आले आहे. 
दुर्दैवाने, या अपघातात तीन वरिष्ठ अधिकारी आणि तेरा जवान ठार झाले. या दुःखद प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे.
Deeply pained by the loss of lives of the Indian Army personnel due to a road accident in North Sikkim.
The nation is deeply grateful for their service and commitment. My condolences to the bereaved families. Praying for the speedy recovery of those who are injured.
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 23, 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना झालेल्या प्राणहानीमुळे खूप दुःख झाले, असे ते म्हणाले. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

