महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कुंभार समाजाला वीटभट्टी व्यवसाय सुलभरीत्या करता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीटभट्टी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने लाभलेल्या विविध जाचक अटी आणि वीट भट्टी चालकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह वीटभट्टी चालक उपस्थित होते.
वीट भट्टी व्यवसाय संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी, माती वाहतूक, बिगर शेती अट, कामगारांचे प्रश्न यावेळी मंत्री महोदयांसमोर शिष्टमंडळाने उपस्थित केले. यातून मार्ग काढून हा व्यवसाय सुलभरीत्या कसा करता येईल यासाठी शासन प्रयत्न करेल, असे विखे यांनी सांगितले. 
यावेळी झालेल्या चर्चेत माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, अतुल जगदाळे, रमेश भालेराव, राधाकिसन दळे, भारत जगदाळे, माधवराव थोरात, नितीन खंडागळे, बाळासाहेब जोर्वेकर, तुळशीराम जोर्वेकर, डॉ. भारत वाकचौरे, राहुल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर, रवींद्र वाकचौरे, विशाल वाकचौरे, सतीश सोनवणे, नवनाथ भालेराव आदीसह वीट भट्टी चालक-मालक उपस्थित होते.

