महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : उत्तर नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत संगमनेर मध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या अटल वकृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अटल वकृत्व स्पर्धेसाठी विजेत्यांमधून स्पर्धक निवडले गेले.
भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्यभरात “अटल युवा पर्व”चे आयोजना अंतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चामार्फत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संगम सेवाभावी संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयात संगम सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. रवींद्र चांडक यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, भाजपा जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यावेळी उपस्थित होते. 
स्पर्धेमध्ये ५५ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया सुशासनावर भर देतो’, ‘भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे’, ‘फुकटच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज’, ‘नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष आहे’ आणि ‘अमृत काल येणारा भारत व युवकांचे योगदान’ ह्या विषयांवर स्पर्धकांनी आपली मते मांडली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर, श्रीराज डेरे युवा मंच व मृत्युंजय विद्यार्थी शाशित संघ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मान्यवरांसमवेत युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. ऋषिकेश खर्डे, जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवंगे, उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, शुभम लहामगे, जिल्हा सचिव किरण गुंजाळ, दत्तात्रय दिघे, भाजपा कार्यालय प्रमुख विकास गुळवे, सुनील घुले, हरीश वलवे, जगन्नाथ शिंदे, आयुर्वेद महाविद्यालयचे प्राध्यापक डॉ. गौरव महाले, डॉ. मनीषा वाळुंज, डॉ. पायल गायकवाड, डॉ. स्नेहल इंदानी यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद थोडसरे व वैभवी कुमावत यांनी केले.

स्पर्धेत हे ठरले विजेते
स्पर्धेमध्ये मृणाल तुपे हिने प्रथम, अमेय पाटील यांनी द्वितीय तर वैष्णवी भोईर आणि रुचिका गोसावी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रकमेचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

