Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणीवपूर्वक बाहेरचे पालकमंत्री दिल्याने जिल्हा विकासाचा आराखडा मांडला गेला नाही : महसूलमंत्री विखे पाटील
पत्रकारिता

जाणीवपूर्वक बाहेरचे पालकमंत्री दिल्याने जिल्हा विकासाचा आराखडा मांडला गेला नाही : महसूलमंत्री विखे पाटील

पर्यटनाबरोबर औद्योगिक विकासासाठी अहमदनगर डेस्टिनेशन गरजेचे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विकास प्रक्रियेत माध्यमांचा सहभाग आवश्यक

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

लोणी : जिल्‍ह्याकडे आजपर्यंत फक्‍त राजकीय दृष्‍टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न झाल्‍यामुळेच जिल्‍ह्याच्‍या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्‍या सहकार्याने बदलविण्‍याचा आपला प्रयत्‍न आहे. पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्‍हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्‍यमांनी सुध्‍दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्‍य साधून प्रवरा परिवाराच्‍यावतीने माध्‍यम प्रतिनिधींशी स्‍नेह संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. जिल्‍ह्याच्‍या विकासाच्‍या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांवर मंत्री विखे पाटील यांनी सविस्‍तर भाष्‍य करुन, जिल्‍ह्याच्‍या तयार करण्‍यात येत असलेल्‍या विकास आराखड्यातील बाबींचे सविस्‍तर विवेचन केले.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिर्डीचे माजी नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, पद्मश्री विखे पाटील कारखान्‍याचे माजी चेअरमन डॉ. भास्‍करराव खर्डे, भगवती माता देवस्‍थान ट्रस्‍टचे उपाध्‍यक्ष भाऊसाहेब खर्डे, बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जपे उपस्थित होते.

भौगोलिकद्ट्या जिल्‍हा मोठा असला तरी प्रत्‍येक तालुक्‍यात असलेल्‍या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, विकासात्‍मक प्रक्रीया साध्‍य होवू शकते यासाठीच आपला प्रयत्‍न आहे. विकास आराखड्याच्‍या बाबतीत आपण सर्वांच्‍याच अभ्‍यासपुर्ण सुचना मागवित असून, त्‍यानुसारच जिल्‍ह्याच्‍या विकासाचे नियोजन परिपुर्ण होवू शकेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, औद्योगिक वसाहतींमधील समस्‍यांचे गांभिर्य मोठे असले तरी, यामध्‍ये सुधारणेला वाव आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या मदतीने सर्व उद्योजकांच्‍या प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍यासाठीही या निमित्‍ताने प्रयत्‍न होतील. राज्‍य आणि राष्‍ट्रीय महामार्ग आता निर्माण होत असल्‍यामुळे दळणवळण सोयीस्‍कर होत आहे. उपलब्‍ध असलेल्‍या जमीनींवर स्‍वतंत्र आयटीपार्क, कृषि प्रक्रीया उद्योग उभारले गेले तर या माध्‍यमातून रोजगाराच्‍या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होवू शकतात.

जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात तिर्थस्‍थान आहेत, तिर्थक्षेत्र पर्यटन हासुध्‍दा विकासाच्‍या प्रक्रीयेचा एक भाग होवू शकतो. जिल्‍ह्यात श्रध्‍दा स्‍थानांकडे येणा-या भाविकांची संख्‍या पाहाता या तिर्थक्षेत्रांच्‍या विकासाचे नियोजन झाले तर, त्‍या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळून स्‍थैर्यही मिळू शकते. याकडे लक्ष वेधून अकोले तालुक्‍यात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्‍येने ट्रेकर येतात. या भागातही रोजगार उपलब्‍धतेच्‍या मोठ्या संधी आहेत. परंतू या भागातील तरुणांनीही पुढे येवून या विकास प्रक्रीयेसाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. सरकार सर्वोतोपरी मदत करण्‍यास तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

या विकासाच्‍या नियोजनात सर्वांचेच सहकार्य लागणार आहे. कारण आत्‍तापर्यंत जिल्‍ह्याकडे राजकीय दृटीकोनातूनच पाहीले गेले. जिल्‍ह्यातला माणूस पालकमंत्री होवू नये म्‍हणून जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाले. त्‍यामुळे विकासाच्‍या चर्चा झाल्‍या नाहीत. परंतू ही परिस्थिती बदलविण्‍यासाठी आता सर्वांच्‍या सहकार्याने प्रयत्‍न करायचे आहेत.

जिल्‍ह्यातील अनेक भूमीपुत्र देशात आणि परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी नवीन काय करता येईल अशा सुचनाही आपण त्‍यांच्‍याकडून मागवत आहोत. हे सर्व भूमीपुत्र एकत्र आले तर विकासाचा नवा प्‍लॅटफॉर्म तयार होवू शकेल. या विकासाच्‍या प्रक्रीयेत माध्‍यमांची भूमिकाही आमच्‍या दृष्‍टीने महत्‍वपुर्ण आहे. यासाठी आपणही या विकास प्रक्रीयेचे भागीदार व्‍हा अशी इच्‍छा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्‍त केली. या स्‍नेह संवाद कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी केले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले..

पालकमंत्री पद आता नगर जिल्‍ह्याकडे आल्‍याने प्रलंबित प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्‍याची संधी मोठी मिळाली आहे, तसे प्रयत्‍नही सुरु झाले आहेत. परंतू सामाजिक जबाबदा-याही वाढत आहेत याकडे लक्ष वेधून जिल्‍ह्यामध्‍ये धर्मांतर आणि लव्‍ह जिहादच्‍या वाढत्‍या घटनांचे गांभिर्य माध्‍यमांनी ओळखून याबाबत जागृती करण्‍यासाठी पुढे येण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 351
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.