महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणावरून राग अनावर झालेल्या गावातील सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यानंतर उर्वरित आरोपींनी साठी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी बंद केलेल्या पाणीपुरवठा संदर्भात प्रश्न विचारला होता. इघे यांनी ग्रामसभेत विचारलेला प्रश्न सत्ताधाऱ्यांना रुचला नाही त्यामुळे त्यांनी त्याला ग्रामसभेतच धमक्या दिल्या होत्या.
त्यानंतर इघे आपल्या मित्रासोबत साकुर कडे जात असताना जवळच्या घाटामध्ये पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने त्यांना गाठत लोखंडे रॉड, काठ्या, कोयत्याने गंभीर मारहाण केली होती. तसेच रिवाल्वर दाखवत जीवे मारण्याची देखील धमकी इघे यांना देण्यात आली होती. अर्धमेल्या अवस्थेत इघे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
त्यानंतर घारगाव पोलिसांनी इघे यांच्या तक्रारीवरून गावातील सोळा बड्या पुढार्यांसह आणखी पंधरा-वीस जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. सत्ताधारी गावपुढारी असलेले यातील काही आरोपी राज्याचे माझे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बड्या संस्थांचे पदाधिकारी आहे. आरोपींची प्रतिष्ठा आणि राजकीय वजन लक्षात घेता याप्रकरणी पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. यातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केले असून उर्वरित आरोपी फरार असल्याने त्यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता.
न्यायाधीश वाय. पी. मनाटकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे आता आरोपींसमोर पोलिसांना शरण येणे अथवा उच्च न्यायालयात जाणे एवढाच पर्याय राहिला आहे. प्रतिष्ठित आरोपींवर काय कारवाई होते, याकडे पठार भागातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मारहाण करणाऱ्या साकुरच्या ‘त्या’ बड्या पुढार्यांना अटकपूर्व जामीन नाहीच
संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

