महाराष्ट्र संवाद न्यूज
आई आणि तिच्या दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील मन्याळे येथे समोर आला आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे अकोले तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.
सुनिता अनिल जाधव (वय 48 वर्ष), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22 वर्ष) आणि शितल अनिल जाधव (वय 19 वर्ष) अशी दुर्दैवी माय लेकींची नावे आहे. सुनिता जाधव यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मुली प्राजक्ता आणि शितल या दोघी बहिणींनी गावातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
तिघी मायलेकींनी आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेव्हा विच्छेदनानंतर तसेच पोलीस तपासात ही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान तिघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस आणि संगमनेरचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

