महाराष्ट्र संवाद न्यूज
ठाणे :
राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे, ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालेले असल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देत दिलासा दिला आहे. ते म्हणाले,” सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निर्देशही दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आपल्या कुटुंबीयांसह धुळवड साजरी करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळीच मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भात परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळायला हवा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे या दृष्टीने महसूल यंत्रणेने कामाला लागावे आणि पंचनामे करावे. असे देखील शिंदे यांनी सांगितले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2023

