Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटते : विरोधी पक्ष नेते अजित पवार
राजकारण

सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटते : विरोधी पक्ष नेते अजित पवार

भाजप व शिंदे गटाची युती जनतेला मान्य नाही, अन्य विषयावरही केले भाष्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर : पुण्याच्या कसबा पेठ व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकांचे निकाल बघता जनतेने सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची झालेली युती जनतेला मान्य नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत असून सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते.

सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पवार म्हणाले राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यात अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. श्रीरामपूरची घटना देखील ताजी आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असताना अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळी दिली जात नाही. कोयता गॅंग, दुचाकी चार चाकी गाड्या पेटवून देण्याचे प्रमाण वाढत आहे.

राज्यात कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात आम्ही दोन्ही सभागृहात आवाज उठवला. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारने जे उत्तर दिले आहे ते योग्य नाही. सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळायला हवा होता तसे घडले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभऱ्यासारखी उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या होळीचा बेरंग झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत तात्काळ मंत्र्यांनी व प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यायला हवेत. मात्र सरकार याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही.

आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. आगामी काळात आम्ही त्यांना दीडपट भाव देऊ, मदत करू, असे सत्ताधारी म्हणाले होते. त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटले मात्र, दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. उलट देशात गॅसचे, पेट्रोलचे दर वाढत चालले आहे. महागाई सुद्धा वाढत चालली आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.

संभाजीनगर व धाराशिव हा नामांतराचा विषय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला होता. या दोन शहरांच्या नामांतर आम्ही महाविकास आघाडी सरकार असतानाच केलं. मात्र त्यानंतरच्या नामांतरासंदर्भातील गोष्टी या केंद्र सरकारच्या हातात असतात. नामांतर जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे याकडे देखील सरकारने लक्ष द्यायला हवे. असे देखील ठाकरे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 218
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.