महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत केलेली चर्चा यशस्वी ठरली आहे. चर्चेमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याने मंगळवारपासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आठवडाभरापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. अधिवेशनात देखील या संपाचे पडसाद उमटले. संपकऱ्यांच्या मागण्यांमध्ये लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये केली होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज झालेली चर्चा यशस्वी ठरली. शिष्टमंडळामध्ये संपकऱ्यांच्या वतीने 16 सदस्य होते.
येत्या तीन महिन्यांमध्ये सरकार संपकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आश्वासन सरकारने दिल असल्याचे सांगितले जात. त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत असल्याची माहिती संपकऱ्यांच्यावतीने माध्यमांना देण्यात आली आहे. तसेच संपकऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

