महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्तीसगडच्या दंतेवाडा भागामध्ये भारतीय जवानांवर नक्षली हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांनी भारतीय जवानांचे पीकअप उडविली असून यात 11 भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात माओवाद्यांनी भारतीय जवानांचं पिकअप उडवलं. त्यामुळे अनेक जवान जखमी झाले होते. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.
अधिकृतरित्या यावर अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र, एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात धक्कादायक वृत्त दिले आहे. या हल्ल्यामध्ये जवानांचं मोठ्या नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं डीआरजी दल माओवादी कॅडरच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून दंतेवाडा येथून नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना झालं होतं.
ऑपरेशन फत्ते केल्यानंतर परत येत असताना अरणपूर रस्त्यावर माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. एका आयईडी स्फोटानंतर गोळीबार देखील झाल्याची माहिती मिळत आहे. असे असले तरी भारतीय जवानांनी देखील नक्षलवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली.
Union Home Minister Amit Shah speaks with Chhattisgarh CM Bhupesh Baghel over the naxal attack that claimed lives of 10 DRG (District Reserve Guard) personnel and one driver, in Dantewada.
(file pics) pic.twitter.com/tP55CSj5qu
— ANI (@ANI) April 26, 2023

