Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मित्राचा खून केल्याच्या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली ही मोठी शिक्षा
न्यायालय

मित्राचा खून केल्याच्या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली ही मोठी शिक्षा

फेब्रुवारी 2022 मध्ये अकोले येथे घडली होती घटना, 14 महिन्यातच न्यायालयाने दिला निर्णय
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3 फेब्रुवारी 2022 च्या रात्री आठ वाजता फिर्यादी आणि आरोपींनी एकत्रित जेवन केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला सांगितले की, ‘तू तुझ्या घरी जा आणि मी माझ्या घरी जातो’ असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपी साळुंखे याने फिर्यादीला लाथा बुक्क्याने मारहाण केली यात फिर्यादीला मुका मार लागला होता.

त्यामुळे फिर्यादीने तेथून जवळच राहत असलेल्या त्याच्या मित्राला सरबजीत ओमप्रकाश चौहान याला बोलावून घेत मारहाणीची माहिती दिली. त्यामुळे चौहान याने आरोपी साळुंखे याला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर साळुंखे हा तेथून निघून गेला आणि थोड्यावेळाने त्याच्या पत्नीला घेऊन फिर्यादीच्या चहाच्या दुकानावर आला. तेथे त्याने चौहान याला तू मला मारहाण केली, मी तुला आता सोडणार नाही असे म्हणत जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने चौहान याला मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले. जखमी चौहान याच्यावर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडले असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झालेला होता.

त्यामुळे या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात आरोपी साळुंखे यांच्या विरोधात खुणासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणी तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यातील काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.

सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांनी आरोपीला भादवि कलम 304 (सेकंड पार्ट) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडाचे आणि दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,022
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.