अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज)
लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.
भंडारदरा धरणामध्ये सद्यस्थितीत 59.60% पाणीसाठा शिल्लक असून निळवंडे धरणामध्ये सद्यस्थितीत 57.12% पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी सायंकाळी निळवंडे मधून 600 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून साधारणतः 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे.
भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.

