महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी सोळा आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वाढ केली आहे.
सुरुवातीला पकडलेल्या 16 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलिसांच्यावतीने सरकारी वकील मिराज पर्बत यांनी जोरदार व्यक्तिवाद करत आरोपींच्या पोलीस वाढ करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आणखी वाढ केली.
रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस यंत्रणेने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.
दरम्यान या प्रकरणी पोलीस आणखी आरोपींचा शोध घेत आहेत.
या आरोपींच्या कोठडीत झाली वाढ
नईम कादर शेख, रेहान गुलफान पठाण, शेहबाज याकूब शेख, मोबीन मुबारक शेख, नफीस अनिस पठाण, अमीर रफिक शेख, इम्रान उस्मान पठाण, तौफिक शफिक शेख इस्माईल निसार पठाण, अबुजर बिलाल शेख, अलताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अमजद गुलामनबी शेख, शकील नासीर पठाण, शेहबाज गफार शेख व अहद सय्यद आद अन्सार यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

