Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सर्वसामान्य माणसांची सोय हा निकष लावून संगमनेर जिल्हा घोषित करा! सर्वपक्षीय कृती समितीचे प्रांत अधिकारी यांना निवेदन
आंदोलन

सर्वसामान्य माणसांची सोय हा निकष लावून संगमनेर जिल्हा घोषित करा! सर्वपक्षीय कृती समितीचे प्रांत अधिकारी यांना निवेदन

जिल्हा विभाजन प्रश्नाने पुन्हा एकदा जोर धरला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 20, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अनंत पांगारकर | संगमनेर

शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवरून शिर्डीमध्ये मंजूर केलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनासाठी कळीचा मुद्दा ठरले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा कृती समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित आहे. उत्तर नगर दक्षिणचे मुख्यालय कोठे करावे, यावरून या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले असून संगमनेर, श्रीरामपूरसह शिर्डी जिल्हा मुख्यालयाच्या स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल मंत्री पद नगर जिल्ह्यात विशेषत: शिर्डी, संगमनेर मतदार संघामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचे निर्मिती करणारे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनावर घेतले असते तर त्यांच्या एका सहीच्या फटकाऱ्याने जिल्हा विभाजन होऊ शकले असते. मात्र महसूल मंत्री पद असून देखील थोरात जिल्हा विभाजन करू शकले नाही असा थेट आरोप करत तत्कालीन जिल्हा कृती समितीने विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तत्कालीन भाजप-सेना सरकारच्या काळात हा प्रश्न लावून धरला होता.

विखे पाटील यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जिल्हा विभाजनाचे गाऱ्हाणे पोहोचविण्यात कृती समिती यशस्वी ठरली. तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनीदेखील कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा विभाजन प्रश्न सकारात्मकता दाखवत संगमनेरकरांना शक्य तितका जोर लावण्याचे सूचित केले होते. मात्र त्यानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न बारगळला गेला.

मधल्या काळात 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे महसूल मंत्री पद पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने संगमनेरला मिळाले. मात्र थोरात यांच्या नंतरच्या कार्यकाळात देखील जिल्हा विभाजनावर कोणताही निर्णय झाला नाही. थोरात यांनी देखील असा कोणताही प्रस्ताव शासन दरबारी नसल्याचे तसेच त्यासाठी असणाऱ्या अडचणी देखील स्पष्ट केलेल्या होत्या.

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या रूपाने पुन्हा एकदा भाजप शिवसेना युती सत्तेत आली. या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाचे ठरणारे महसूल मंत्री पद पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला मिळाले. विखे पाटील यांनी देखील मध्यंतरीच्या काळात जिल्हा विभाजन शक्य नसल्याचे तसेच जिल्हा विभाजनापेक्षा अन्य प्रश्न महत्त्वाचे असल्याने याबाबतीत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा बारगळला असतानाच मंत्री विखे पाटील यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी साठी मंजूर करून घेतले. याशिवाय श्रीरामपूरला असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे कार्यालय देखील खाली करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिल्या गेल्याने हे कार्यालय देखील हलविण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा विभाजनासाठी विखे यांचा कल शिर्डीकडे असल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचा प्रश्न चर्चेत आला असून या प्रश्नबाबत श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा श्रीरामपूर बंद ठेवत श्रीरामपूर मुख्यालयाची मागणी पुढे आणली आहे. असे असतानाच संगमनेरकरांनी पुन्हा एकदा जिल्हा मागणीसाठी एल्गार दिला आहे. संगमनेर जिल्हा मागणी कृती समितीने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन संगमनेर जिल्हा घोषीत करण्याची मागणी केली आहे. विश्‍वासात न घेता शासनाने जर जिल्हा विभाजनाचा परस्पर निर्णय घेतला तर उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी शासनावर राहिल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर कसे योग्य आहे या दृष्टीने निवेदनात सविस्तर उहपोह करण्यात आला आहे.

निवेदनावर शरद थोरात, राजेंद्र देशमुख, प्रशांत वामन, निलिमा घाडगे, अशोक सातपुते, निर्मला गुंजाळ, प्रविण कर्पे, भगवान गिरी, अमोल खताळ, गणेश बोर्‍हाडे, नारायण खुळे, सुशांत पावसे, विकास गुळवे, प्रशांत कोल्हाळ, सी.आर.रोकडे, राजेश आसोपा, लक्ष्मीकांत दसरे, अमित चव्हाण, किरण घोटेेकर, देशमुख संदेश, अमर कतारी, रौफ शेख, राहुल भोईर, मनिषा अभंग, निलम खताळ, भारत गवळी, अक्षय थोरात, अजिंक्य उपासणी, श्याम तिवारी, भास्कर गुंजाळ, प्रसाद पवार, विश्‍वास मुर्तडक, सिताराम मोहरीकर, निखिल पापडेजा, धिरज ठाकूर, भारत रेघाटे, योगेश सुर्यवंशी, अक्षय बिल्लाडे यांच्यासह सुमारे 50 होऊन अधिक सर्वपक्षीयांच्या सह्या आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 885
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.