महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – अधिवेशनात पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने बघावयास मिळाले.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर थोरात यांच्या टिकेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आम्हालाही गांभीर्य आहे. काही भागात पाऊस कमी असल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
पुणे आणि नाशिक विभागात पेरण्या कमी प्रमाणात झाल्या. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितला आहे, त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील.
यासंदर्भात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने एक आखणी केली आहे. गेल्या वर्षभरात दहा हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली नियमित कर्ज भरणाऱ्या साडेसहा लाख शेतकऱ्यांपैकी फक्त पन्नास हजार जण बाकी आहे. बाकी सर्वांना कर्ज वाटप करण्यात आले.
राज्यात पाऊस कमी आहे, याचा आढावा आम्ही कालच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 80% पेरण्या झाल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तसा आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹10,000 कोटीहून अधिकची मदत देण्यात आली आहे.
बोगस… pic.twitter.com/AUTwENM4Sg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2023
कोणत्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

