कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये
महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही.
तसेच इर्शाळवाडीला दिखाव्यासाठी गेलो नव्हतो. हे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते सरकार काम करत नाही असे ते म्हणाले.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांची मदत केली असून शेतकऱ्यांची मदत वाढवली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांना आता केंद्राचे मिळून वर्षाला 12000 रुपये मिळतील. तसेच पुरामध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल. याबरोबर टपरीवाल्यांना देखील 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ज्यांचे नुकसान जास्त असेल त्यांना 75 टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच छोटी टपरी असेल तर दहा हजार रुपये मदत देणार असल्याचे ते म्हणाले.
कृषी सेवकांचे मानधन सहा हजारावरून सोळा हजारावर…
अजित पवार सत्तेत आल्यामुळे सरकारला बूस्टर मिळाले आहे. सरकारला वेग आला आहे. हे मान्य करायला पाहिजे महाविकास आघाडीने बंद पाडलेले काम आम्ही सुरू केले आहे. एक रुपयात आपण पिक विमा दिला आहे. शेवटचा शेतकरी यामध्ये येणार असून आत्तापर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

