‘अमृत महोत्सवी भारत’ या विषयावर ॲड. असीम सरोदे कॉम्रेड डॉ. अजित नवले मांडणार विचार
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कालकतीत प्रेमानंद (बाबूजी) रूपवते यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त संगमनेरमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. संघराज रुपवते यांनी दिली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात असतील अध्यक्ष : शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे.
अमृत महोत्सवी भारत या विषयावर हे मांडणार विचार : अभिवादन कार्यक्रमादरम्यान बाबूजी यांच्या स्मृती जागवताना अमृत महोत्सवी भारतातील स्थित्यंतराविषयी चर्चा होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे आणि अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉम्रेड डॉ. अजित नवले हे अमृत महोत्सवी भारत या विषयावर आपले विचार मांडणार आहे.
यांनी केले आवाहन: संगमनेरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी केले आहे.

