Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोट निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य करत या चर्चांना दुजोरा दिला आहे. टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला. आगीच्या घटनेची चौकशी व्हावी, तसेच आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज घारगाव – गावाकडे साकुर येथे घरी आलेल्या दोन जावांमधील वादाची परिमिती नवरा-बायकोने महिलेला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली. वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. संगमनेरच्या पठार भागात साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या पतीसह गावी साकुर येथे राहावयास असून पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उन्हाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सर्वांगातून घामाच्या धारा वाहत असतांना संगमनेरच्या गीता परिवार संचलित संस्कार बाल भवनच्या शंभरावर मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. मालपाणी हेल्थ क्लबच्या सहकार्याने यासर्व मुलांना जीव रक्षकांच्या निगराणीत जलतरण तलावात सोडण्यात आले. यावेळी लहान मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र वर्तुळाकार हौदात बाल भवनमधील सर्वाधीक लहान मुलांची धम्माल अनुभवायला मिळाली. मुलांनी पाण्यात मनसोक्त डूंबण्याचा आनंद घेतला. गीता परिवाराच्यावतीने दरवर्षी उन्हाळ्यात ज्या प्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन होते, त्या धर्तीवर बाल भवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी बाल भवनमधील मुलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने बरीच लहान मंडळी पाहुणे म्हणून संगमनेरात आली आहेत. त्यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरातील मोठ्या वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास एका वृक्षाची धोकादायक फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. फांदी रस्त्यावर पडत असताना तेथून जाणाऱ्या-येणाऱ्याचा अंगावर पडण्याची शक्यता होती. मात्र सतर्कता दाखविल्याने दुर्घटना टळली. शहरातील नवीन नगर रस्त्यावर एका डेरेदार वृक्षाच्या काही धोकादायक फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरम्यान शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारस कडकड करत एक फांदी अचानकपणे तुटून मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर पडली. यावेळी रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. फांदी तुटत असताना मोठा आरडाओरडा झालेला येथून लोक बाजूला पळाले. तुटणारी फांदी एका त्वचा की जवळ पडली त्यामुळे दुचाकी चालविणारा वृद्ध गृहस्थ आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज काय ग !!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी ? ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अंत्यत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली ….. ताय, वंजळभरच पायजेती.. द्याकीव. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती. अनघा – नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून. असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून यात 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्यासह लाखो रुपये किमतीची दोन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहे. नासिकहून मुंबईच्या दिशेने दोन वाहनांमधून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इगतपुरी जवळील ग्रँड परिवार हॉटेल समोर वाहन पकडण्यासाठी सापळा लावला होता. पोलीस पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यांना दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी…
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धीसारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना २१ इंच लांबीची गुप्ती जवळ बाळगणाऱ्या चार जणांना संगमनेर तालुक्यातील शिवारामध्ये वडगाव पान ते तळेगाव रस्त्याच्या पाटावर करुले शिवारात पकडण्यात आले आहे. आरोपी पैकी तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असून एक आरोपी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील आहे. कैलास अशोक सावंत (वय २४ वर्ष), मारुती बळवंत सावंत (वय ७० वर्ष, दोन्ही रा. मु. गोसिंग गाव, पोस्ट नांदुरा, जि. बुलढाणा), राजू रावसाहेब शिंदे (वय २३ वर्ष, रा. मुंबरा पो. बोरजवळा ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जितेश भाऊसाहेब गोडे (वय २४ वर्ष, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, सर्व हल्ली रा. समनापुर, ता. संगमनेर) अशी आरोपींची…
अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये मोठे भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर मध्ये आले असता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या शेजारी बसलेल्या (विखे-शिंदे) दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देत मी त्यांना घेऊन बसलो आहे. वाद असला तरी वादळ नाही, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे… त्यामुळे चिंता करू नका. अशा शब्दात या वादावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले बघा व्हिडिओ…
