अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये मोठे भाष्य केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर मध्ये आले असता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या शेजारी बसलेल्या (विखे-शिंदे) दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देत मी त्यांना घेऊन बसलो आहे. वाद असला तरी वादळ नाही, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे… त्यामुळे चिंता करू नका. अशा शब्दात या वादावर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले बघा व्हिडिओ…

