Author: अनंत पांगारकर

रविवार, २४ नोव्हेंबर  राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून २६ नोव्हेंबर पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या काही तासात होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागते याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहे. सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊले टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी…

Read More

रविवार, २४ नोव्हेंबर – मुंबई  राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत दिसणार आहे. दरम्यान महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू असून राज्यातील जनतेची उत्सुकता वाढीस लागली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा उद्या सोमवारी (२५ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रातील काही दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता असून नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते तसेच मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळते यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून राज्यात २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तर ४९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले असून अन्य ०४ जागांवर इतरांचा विजय झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४५ सदस्यांचा आकडा गाठण्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येत असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार 1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा)…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागून महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा जबर झटका बसला आहे. आघाडीचे आगामी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं होतं त्या संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला. हा निकालही आश्चर्यकारक मानला जातो. मुंबई माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनाही पराभव पत्करावा लागला. भाजपने अमित यांना पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरलं आहे. तिकडे वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यांनी माजी मंत्री मिलिंद…

Read More

शनिवार २३ नोव्हेंबर – मुंबई विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. पाठोपाठ राज्यात महायुती सरकारने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीच्या दिशेने कल हेच धक्कादायक निकाल समोर आले आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने प्रत्येकी चार-चार तर शिवसेना शिंदे गटाने दोन जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दोन्ही जागांवर दिलेले भाजपचे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला प्रत्येकी एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये देखील महायुती सत्ता…

Read More

शनिवार, २३ नोव्हेंबर – संगमनेर  अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहे. समोर आलेल्या निकालामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी चार-चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून त्यांना तब्बल १,२४,६२४ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्या पाठोपाठ भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०२८२ एवढ्या मताधिक्याने आणि भाजपाचे विक्रम पाचपुते ३६८२७ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहे. …

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक मतमोजणीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत बस स्थानक चौकात गर्दीतून वाहन चालकांना वाट काढून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला वाहनाचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी होऊन पायाला इजा झाली आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. संगमनेर बस स्थानक चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा) हे बस स्थानक चौकात बंदोबस्त करीत असताना गर्दीत एका वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाच्या धडकेत त्यांच्या पायाला इजा झाली आहे. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बस स्थानकासमोर हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…

Read More

शनिवार २३ नोव्हेंबर – संगमनेर  संगमनेर विधानसभा मतदारसंघात चार दशकानंतर प्रथमच परिवर्तन बघावयास मिळाले असून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अमोल खताळ यांनी राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला. राज्यातील दिग्गजांच्या भराभवांमध्ये हा पराभव गणला जात असून नवखे उमेदवार असलेले खताळ राज्याच्या राजकारणात पोहोचले आहे. उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे… अमोल खताळ (महायुती) – ११२३८६ मताधिक्य – १०५६० बाळासाहेब थोरात (महाविकास आघाडी) – १०१८२६ अजीज ओहोरा (वंचित बहुजन आघाडी) – २०६९ योगेश सूर्यवंशी (मनसे) – १२८५ दत्तात्रय ढगे (अपक्ष) – ५४७ शशिकांत दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) – २२६ भारत भोसले (समता पार्टी) – १७४…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रतिनिधी  शनिवार, २३ नोव्हेंबर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या चार दशकांपासून आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या होम स्पीचवर पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे नवखे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला आहे. राज्यातील बऱ्या नेत्याचा पराभव करणारे खताळ या मतदारसंघात अखेर गेमचेंजर ठरले. थोरात यांचा पराभव संगमनेरकरांसाठीच नव्हे तर राज्यातील काँग्रेससाठी धक्कादाय ठरला असून गेल्या चार दशकानंतर प्रथमता विरोधकांना या मतदारसंघात मिळालेले यश थोरात यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा…

Read More

शनिवार 23 नोव्हेंबर – शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6332 मतांनी आघाडीवर आहेत. विखे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांनी तिसऱ्या फेरी अखेर 12886 तर विखे यांनी 19218 मते मिळविली आहे. तर बंडखोरी केलेल्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी तिसऱ्या फेरी अखेर 136 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू शेख यांनी 146 मते मिळविली.

Read More