Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी लावून धरली आहे. तसेच घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन व काही शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना मध्यस्थीची विनंती केली. थोरात यांनी तातडीने कृषी विभागाला शासकीय बफर स्टॉकमधील युरिया मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रशासनाने ती मागणी मान्य करताच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नाशिक-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी बांधव आणि महिला युरियासाठी पहाटे पाच वाजेपासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने साफ बट्ट्याबोळ चालवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत त्यांच्याकडून उघडपणे लाचेची उकळपटी करणाऱ्या मेडीकव्हर हॉस्पिटलमधील दोन बड्या धटिंगणांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. रुग्णाच्या आईवर उपचार करण्यासाठी आणि तिचे ऑपरेशन या योजनेतून करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर सुभाष धाडवड आणि त्याला खतपाणी घालणारा हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आवळल्या असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढती अनियमितता, परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थीविरोधी धोरणांमुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील शिक्षण क्षेत्रात विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित असलेली सर्व महत्त्वाची कामे सहजासहजी मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. व्यवसायात धनलाभाचे चांगले योग आहेत आणि जोडीदाराचा सल्ला अत्यंत लाभदायक ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. नाहक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. व्यवसायात घाईगडबडीने कोणतेही आर्थिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर अधिक एकाग्रता ठेवण्याचा हा काळ आहे. मिथुन – आजचा दिवस खूप छान आणि लाभदायक सिद्ध होईल. बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलता वाढेल. नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात व्यवसायात फायदेशीर ठरतील. मुलांशी संबंधित असणारे प्रश्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीतर्फे (CJP) पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात जोरदार लाठीचार्ज केला. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये जमा झालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र झटापटीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रेल भवनजवळ पोहोचलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमुळे संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी करणे, संवाद साधणे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हीच खरी लोकशाहीची ओळख असते. मात्र, आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे हे स्पष्टपणे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि त्यांचे मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीचा नाही तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. सोनम वांगचुक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरणात सलोखा राहील. प्रवासाचे योग येत आहेत, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनोद सूर्यवंशी हे आपल्या लहान बाळाला अँटी रेबीज लसीकरणासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता, तेथे आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून गैरहजर होते, यामुळे अनेक पालक आपल्या आजारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान दुकाने क्षणाचाही विलंब न लावता जमीनदोस्त केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला आपला उदरनिर्वाहाचा मार्ग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक गरीब व्यावसायिक भावनिक झाले होते. या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम अत्यंत पक्षपाती आणि निवडक पद्धतीने राबवली गेल्याची भावना संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप…
