Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणारा खर्च टाळणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज व्यवसायात किंवा नोकरीत थोडे संयमाने काम करण्याची गरज आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान पोहोचवू शकतात. आर्थिक स्थिती मध्यम राहील, त्यामुळे जुन्या गुंतवणुकीवर भर द्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील. संध्याकाळच्या वेळी मानसिक शांतता लाभेल. मिथुन – आजचा दिवस सकारात्मक बदलांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेगाने पूर्ण होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका निर्णायक वळणावर पोहोचला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी भव्य ‘चक्काजाम’ जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना ही लढाई कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा नेत्याची नसून, ती सामान्य नागरिकांच्या भविष्याची असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. सध्या एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे जनतेच्या अपेक्षा आणि गरज अद्यापही कायम आहेत. सरकारने कोणत्याही प्रकारचा संकुचित नफा-तोट्याचा विचार न…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात परस्पर सुसंवाद आणि आनंद राहील. वृषभ – आज तुमच्या प्रगतीची नवीन दालने उघडतील. व्यवसायात नवीन विचारांचा अंमल कराल. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. निर्णय घेताना घाईगडबड टाळा आणि बोलण्यावर संयम ठेवा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र तऱ्हेचा राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. कर्क – मालमत्तेशी संबंधित व्यवहारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीमध्ये मनासारखी जबाबदारी मिळाल्याने उत्साह वाढेल. कामाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम उद्या शुक्रवारी (३१ जुलै) आयोजित करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्स येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप केले जातील. तसेच नवीन योजनांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्य राहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य अत्यंत भावुक झाला होता. देशासाठी खेळताना नेहमीच सच्चेपणाने योगदान दिल्याचे सांगत, भारतीय क्रिकेटच्या या गौरवशाली पर्वाचा भाग होता आल्याबद्दल त्याने मनापासून समाधान व्यक्त केले. खेळणे थांबवले तरी खेळाप्रति योगदान देण्याचा ध्यास कायम राहील, असा विश्वासही त्याने यावेळी दिला. डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेनने खडतर प्रवास करत क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अजिंक्यने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. सुरुवातीच्या काळात दिग्गजांच्या उपस्थितीमुळे प्रदीर्घ वेळ राखीव बाकावर बसावे लागले, तरीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई / संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकारणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची आमदारकी थेट धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. थोरात यांच्या बाजूने वकील ॲड. अमित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: मुलींच्या शिक्षण व स्वावलंबनाच्या गप्पा मारल्या जात असतानाच संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे स्पष्ट माहीत असूनही कायद्याची पायमल्ली करत तिचे लग्न लावून देणाऱ्या ५ जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकुर येथील राजा बिरोबा मंगल कार्यालयात २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा बालविवाह पार पडला. मुलगी १८ वर्षांपेक्षा लहान असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींनी लपून-छपून हा विवाह उरकला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सागर परसराम रसाळ (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात आणि दैनंदिन कामात चांगले यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत संयम बाळगणे गरजेचे आहे, अवाजवी खर्च टाळावा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. मिथुन – आजचा दिवस सर्जनशील कामांसाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी उत्तम आहे. तुमचे विचार स्पष्ट असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल.…
संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय मिळवूनही मंगळापूर येथील शेतकऱ्यांना अजूनही सामाईक रस्ता मिळालेला नाही. सक्षम प्राधिकरणांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागूनही संगमनेर तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाचे आदेश मोठे की तहसीलदार, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील सर्व्हे नंबर ७८ मधील सामाईक रस्त्यावर काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून तो अडवला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मशागत, पिकांची व अवजारांची वाहतूक करणे अशक्य झाले आहे. याविरोधात आप्पा पवार, सिताराम पवार, सूर्यभान पवार, बाळकृष्ण पवार, रावसाहेब…
अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी ( ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल २७ हजार पारायण पार पडले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. आज सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होवून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तीन टप्प्यांमध्ये…
