महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे.
ट्विट: जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज संदर्भात थोरात यांनी समाज माध्यमावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आंदोलन चिरडणे योग्य नाही: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे, हा आजवरचा इतिहास आहे.
केंद्र, राज्यात महाशक्तीचे सरकार मात्र मार्ग निघत नाही: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. या बाबी मराठा आंदोलकांसह आम्ही देखील वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तथाकथित महाशक्तीचे सरकार असताना मार्ग निघत नसेल तर मराठा समाज अस्वस्थ होणारच आहे, सरकारने आंदोलकांची मनोभूमिका समजून न घेता आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 1, 2023


