महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला ३५० ते ३७५ जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे.

नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. नानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. यातच (ता. २५ डिसेंबर) महाराष्ट्र राज्याशी संबंधीत सी-व्होटर आणि एबीपीचा सर्वे अहवाल समोर आला आहे.
या अहवालात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के मते अधिक मिळणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

