महाराष्ट्र संवाद न्यूज
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकास कामांसाठी मोठा निधी मिळविला होता. मात्र सरकार बदलताच नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली. विविध विकास कामांवरील ही स्थगिती न्यायालयातून उठवली आहे. त्यामुळे थांबलेली विकास कामे सुरू होतील. यापुढील काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कुरण-पारेगाव खुर्द-नान्नज दुमाला या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माईल, जावेद महम्मद हुसेन, प्रभाकर सोनवणे, शाहानवाज महमद हमीद, अजीज मोहिद्दन, मुदसर मन्सुर सय्यद, तार महम्मद अबास, खलील अबास, रियाज लतीफ आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोरात म्हणाले, अनेक अडचणी आणि संकटांवर मात करत आपण निळवंडे धरण पूर्णत्वास नेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळवत कालव्यांची कामे देखील पूर्ण यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांना वगळून धरणाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम लोकार्पण समारंभात जे पुढे धडपड करत होते ते प्रत्यक्षात कामाच्या वेळी कोठेही हे येथील जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र यामध्ये ज्यांचे योगदान नाही, असे लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे.
याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी आपण साधारणतः साडेसातशे कोटी रुपयांचा निधी मिळविला. रस्त्यांच्या कामासाठी देखील मोठा निधी मिळविला. मात्र सत्तांतर होताच विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना सरकारने स्थगिती दिली. ही स्थगिती हायकोर्टातून उठविली गेली आहे, त्यामुळे आता कामे पूर्ववत सुरू होतील.
सर्वत्र सध्या जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक बाब आहे. राज्यात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही, त्यामुळे राज्यातील जनता आता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे दिसते. काळ कठीण असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात राज्यात सरकार महाविकास आघाडीचेच असेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

उबेद शेख म्हणाले, आमदार थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. कुरण गावावर त्यांनी सातत्याने प्रेम केले. त्यांच्याच माध्यमातून आता कुरण ते पारगाव खुर्द रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
जंगी मिरवणुकीसह ग्रामस्थांकडून थोरात यांच्याप्रती कृतज्ञता…
आमदार बाळासाहेब थोरात यांचे कुरणमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली. गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर निळवंडेचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याबद्दल जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचा ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

