Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरण आणि कालव्याची पूर्ती करत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे आमदार थोरातच खरे ‘जलनायक’ -माजी आमदार तांबे
इतिहास

निळवंडे धरण आणि कालव्याची पूर्ती करत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे आमदार थोरातच खरे ‘जलनायक’ -माजी आमदार तांबे

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 2, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते.

तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळावे यासाठी धरणाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. धरणाच्या आणि कालव्यांच्या कामासाठी सातत्याने निधी मिळविला.

त्यांच्या पाठपुराव्यातूनच धरण आणि कालव्यांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच पूर्णत्वास गेली. धरणातून केवळ पाणी सोडण्याची औपचारिकताच बाकी होती. मात्र सरकारने दिरंगाई केली. त्यामुळे या धरणाच्या निर्मितीमध्ये थोरात यांचा सर्वाधिक वाटा असून तेच खऱ्या अर्थाने जलनायक आहे. धरणाची स्वप्नपूर्ती झाल्याने धरणातून आता डाव्या उजव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी आले आहे. दुष्काळी भागात पाणी आल्याने जनता आनंदित झाली.

जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार थोरात यांनी धरण व कालव्याची कामे केली. डाव्या कालव्यापाठोपाठ आता उजव्या कालव्यात हे पाणी आल्याने त्यांचे दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाले आहे. “दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी जाईल तो दिवस माझ्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च दिवस असेल”, असे थोरात यांनी म्हटले होते. आज खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले.

यावेळी माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे यांचीही भाषणे झाली. कालव्यातील पाण्याचे पूजन करताना इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, भास्करराव गोपाळे, मनीष गोपाळे, नानासाहेब कानवडे, दत्तू कोकणे, सरपंच संदीप गोपाळे, मीनानाथ शेळके, बाजीराव कवडे, बाळासाहेब गोपाळे, एकनाथ गोपाळे, प्रभाकर गोपाळे, किरण कानवडे, शिरीष गोपाळे, राजेश गोपाळे, नवनाथ कातोरे, लता खताळ, सोमनाथ कानवडे, राहुल चंद्रमोरे, अरुण गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, उन्नती महिला ग्राम संघाच्या महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संदीप गोपाळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर मनीष गोपाळे यांनी आभार मानले

ढोल ताशांच्या आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात पाण्याचे जल्लोषमय वातावरणात पूजन…

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून संगमनेर तालुक्याच्या हद्दीत पाणी आल्यानंतर निमगाव खुर्दसह विविध गावातील महिलांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी ढोल ताशांचा व पारंपारिक वाद्यांचा गजर व आनंदोत्सवात सर्वांनी मोठा जल्लोष करत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,577
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

April 14, 2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

February 17, 2026

संगमनेरला मिळाले अत्याधुनिक मल्टिप्लेक्स, मालपाणी मल्टिप्लेक्सचे आज भव्य उद्घाटन! संगमनेरकरांना एकाच वेळी दोन पडद्यांवर चित्रपट बघण्याची सोय

October 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे…

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.