आनंदोत्सव साजरा करत धांदरफळ, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमजमध्ये जलपूजन
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निळवंडे धरणाचा ४० वर्ष स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना महायुती सरकारने उघडे पाडले. गेली अनेक वर्ष चातकाप्रमाणे निळवंडे कालव्यामधून पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर महायुती सरकारने पाणी मिळवून दिल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले.


