संगमनेर, दि. २४
बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याचे महसूल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धरण आणले असले तरी या धोरणाचा फज्ज्या उडविण्याचे काम त्यांच्याच सरकारमधील सहकारी पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे समोर आले आहे. नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खांडगाव शिवारात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच आरोपीवर चोरीच्या गुन्ह्यासह पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईत निष्पन्न झालेले पाचही आरोपी फरार झाले असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संगमनेरच्या गौण खनिज उत्खननात आणि वाळू तस्करीमध्ये राजकीय पक्षाचेच पदाधिकारी अग्रेसर असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून देखील नेहमीच त्यांच्यावर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो.

शनिवारी (ता. २४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शहरालगतच्या खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रात दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू पक्षाच्या ठिकाणी छापे टाकले. कारवाईत पोलिसांना वाढवणे भरलेल्या दोन पीकअप आढळून आल्या. पोलीस पथकाने कारवाईत दोन्ही पिकअप, दीड ब्रास वाळूसह ६ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तर या वाळू तस्करीशी संबंधित असलेले पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन आडबल व पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. फरार आरोपींमध्ये बबलू सातपुते, सुनील बोऱ्हाडे, रमेश काळे, शुभम थोरात, संतोष ढगे यांचा समावेश आहे.

