महागड्या गाड्या लोकांपुढे जायला नको, हे खरं असलं तरी याच गाड्यांचा वापर करत पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष एका सामान्य पत्रकाराला त्याच गाडीखाली चिरडतो, हे नड्डा यांना चालतं? असले उद्योग करून पुन्हा पक्षाला ४०० चा पल्ला गाठायचा असेल तर तो पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व हे बदमाशांचं, भ्रष्टाचार्यांचं आणि नामचीन गुंडांचं आश्रयस्थान होय, असं कोणी म्हटलं तर त्यात गैर काय? या मार्गाने यश मिळवणं म्हणजे यशस्वी ठरलो असं होणार असेल तर ते देशासाठी कदापि योग्य नाही.