शुक्रवार, दि.१९ एप्रिल
बुधवारी श्रीराम नवमीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दुर्दैवी घटना घडली. पावसे परिवारातील दोन सख्या लहान भावंडांचा शेततळ्यात घडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुका एक परिवार समजून कुटुंबप्रमुख असलेले काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सकाळी या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
श्रीराम नवमीच्या दिवशी सायंकाळी खेळता खेळता शेत तळ्यात बुडून पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्षे) व तिसरा इफेक्ट शिकणाऱ्या प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष) या दोघा भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात दुःखद वातावरण तयार झाले. वर्षभरापूर्वीच घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावरील छत्र हरपले होते. त्यामुळे या मुलांची आई कष्टाने शेती करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होती. मात्र दोन्ही मुलांच्या वृत्तीने या मातेला देखील मोठा धक्का बसला आहे.
या कुटुंबियाच्या भेटीनंतर थोरात म्हणाले, पावसे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील. गावकऱ्यांनी देखील या कुटुंबीयांच्या मागे भक्कमपणे उभे राहत त्यांना आधार देण्याची गरज आहे. यावेळी गावातील प्रमुख गावकरी उपस्थित होते.


