शनिवार, दि. १८ मे
डॉ. ऋषिकेश मालाणी यांचा विद्यावाचस्पती प्रबंध आता ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध झाला असून ही पुस्तक रूपातील प्रबंधाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
डॉ. मालाणी संगमनेरमधील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे कार्यरत आहे. त्यांनी अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील नागरी पतसंस्था व सहकारी संस्थांच्या समस्या व संभावनांचा विस्तारित अभ्यास करून विद्यावाचस्पती प्राप्त केली आहे. या प्रबंधाचे आता ई-पुस्तक रूपात प्रकाशन करण्यात आले.
हे ई-पुस्तक अमेझॉन आणि पोती या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांच्या या शोधनिबंधाचा बँकिंग प्रणाली व सहकारी पतसंस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल नवयुवकांना फायदा होणार आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. मुळे संचालक डॉ. पराग सराफ यांच्यासह संस्थेतील कर्मचाऱ्यांचे यासाठी त्यांना सहकार्य लाभले असल्याचे मालाणी यांनी सांगितले.


