शुक्रवार १२ जुलै
केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे.
https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19
आपल्या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.
सरकारने दरवर्षी हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्याला आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून देईल.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा भाग आहे, ज्यांनी हुकूमशाही सरकारच्या अनेक अत्याचारांना तोंड देऊनही लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी लढा दिला. ‘संविधान हत्या दिन’ लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.
https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19


