Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

मंगळवार, ०४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार, विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी
प्रशासन

माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार, विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी

प्रधान सचिवांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 29, 2024Updated:September 29, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २९ सप्टेंबर

अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले.

नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात अहमदनगर महानगरपालिकेला राज्य स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. महानगरपालिकेने सतत दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळविला आहे. अशी कामगिरी करणारी अहमदनगर महानगरपालिका राज्यात पहिली महापालिका आहे.

संगमनेर नगरपरिषदेने ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. २५ ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये विभागस्तरावर शिर्डी नगर परिषदेने प्रथम, तर देवळाली प्रवरा नगर परिषदेने तृतीय क्रमांक आणि राहाता नगर परिषदेने १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा परिषदेने उत्कृष्ट नियोजन केल्याने जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना १६ पुरस्कार जाहीर झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, कर्जत तालुक्यातील मिरजगांव, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक, संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, चोरकौठे (देवकौठे) व तिगाव, शेवगाव तालुक्यातील वाघाली, आव्हाणे बुद्रुक, श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद, या ग्रामपंचायतींना राज्य आणि विभाग स्तरावर विविध गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी भुमी, वायू, अग्नी, जल व आकाश या घटकात शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार उपाययोजना केल्या आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 452
पुरस्कार माझी वसुंधरा अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

August 3, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, फार्मर आयडी आणि ई-केवायसी…

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

मंगळवार, ०४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 4, 2026

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

August 3, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.