Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीमुळे अनेक जण येतील, मन दूषित करतील परंतु त्यांना वेळीच रोखा आणि राजकारणाची चांगली संस्कृती व परंपरा पुढे न्या – आमदार थोरात
राजकारण

निवडणुकीमुळे अनेक जण येतील, मन दूषित करतील परंतु त्यांना वेळीच रोखा आणि राजकारणाची चांगली संस्कृती व परंपरा पुढे न्या – आमदार थोरात

१२ दिवसात करणार ५०० किलोमीटरचा प्रवास...
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 12, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १२ ऑक्टोंबर

१९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि संबळच्या साथीने भारावून टाकणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाबरोबर संगमनेर तालुक्यातील गावा-गावातील तरुण-तरुणींशी संवाद साधण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसने ही संवाद यात्रा काढली आहे.

गडावर देवीची आरती केल्यानंतर तिरंगा ध्वज आमदार बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

१२ दिवसात करणार ५०० किलोमीटरचा प्रवास…

डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यावस्त्यांवर जाऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी १२ दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास करत येथील सुसंस्कृत राजकारणाबरोबर समृद्ध परंपरा स्पष्ट करत युवक, नागरिक, महिलांसोबत संवाद साधणार आहे.

तालुका खबऱ्यांचा बंदोबस्त करेल – जयश्री थोरात

संवाद यात्रेच्या माध्यमातून बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेत वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा स्वाभिमानासाठी आहे. संगमनेर तालुक्यातील डोंगरदऱ्या, नदी परिसर, पठार भाग, दुष्काळी पट्टा अशी भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात संवाद यात्रा जाणार असून संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती आणि स्वाभिमान प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करेल. युवा पिढीच्या माध्यमातून तालुक्यातील खबऱ्यांचा देखील बंदोबस्त केला जाईल.

संविधान धोक्यात – डॉ. सुधीर तांबे

सध्या संविधान धोक्यात आहे. चांगला भारत घडविण्यासाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे. स्वतःमधील क्षमता ओळखायला शिका. आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात सभ्यता, प्रेम, बंधूभावाची संस्कृती निर्माण केली असून ती जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 547
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात युवा संवाद यात्रा सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

By अनंत पांगारकरJune 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे:  राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन…

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.